हे पारंपारिक महाराष्ट्रीयन मिष्टान्न आहे जे प्रत्येक घरात बनविले जाते. ह्याला "केळीचे शिकरण" असे म्हटले जाते. केळी व्यतिरिक्त चिबूड वापरून देखील बनविले जाते. अगदी लवकर बनणारे, हेलथी, चविष्ट आणि सगळ्यांना आवडणारे असे हे शिकरण महाराष्ट्रात प्रत्येक घरात खूप आवडीने खाल्ले जाते.